Wednesday, October 15, 2008

नाट्यसंगीत

किती सांगुं तुला मज चैन नसे ॥हें दु:ख तरी मी साहुं कसें ।या समयिं मला नच कोणी पुसे ।हा विरह सखे मज भाजितसे ।मन कसें आवरूं ।किती धीर धरूं । कसे करूं ॥हे बंधु नव्हत मम वैरी खरे ।दावीती कसें वरि प्रेम बरें ।बोलोनी पाडीती हृदयासी घरे ।नको नको मला जिव ।विष तरि पाजिव ।सखे सोडिव ॥


गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-बालगंधर्व
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
राग-आनंद भैरवी (मूळ संहिता)
ताल-धुमाळी

No comments: