Sunday, December 28, 2008

विजय....

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरले आहात............"स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन.....स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात....."आकाशीचा चंद्र कुणाच्या हाती लागत नाही,त्याच्याखेरिज माझे मन पण काही मागत नाही..... हाथ की लकीरो में नसीब क्यूं ढूंढता है गालीब ?नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नहीं होते ......

शाळेत जायचयं...


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय।

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय


नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर

छान अक्षरात आपल नाव लिहायचाय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय।
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडून


नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,

कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा , बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय।



उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?

हा विचार करत रात्री झोपी जायचय,

अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय।


घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,


घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय।


कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा

दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,

कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,


कितीहि तुटका असु दे॥ ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा

दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय .