अर्जुन तर संन्यासि होउनी रैवतकीं बसला ।झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला ।वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।तत्वनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला ।प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला ।सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला ।ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ।कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ।भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ।तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ।
गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर
नाटक-संगीत सौभद्र (१८८२)
चाल-शिवाज्ञेची वाट न पाहता’
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment